महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पक्षाविरोधात बंड पुकारल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आधी सुरत आणि त्यानंतर गुवहाटीला शिंदे गटामध्ये एक एक करुन तब्बल ३७ आमदार सहभागी झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं. मात्र या साऱ्या घडामोडींदरम्यान सातत्याने एवढं मोठं बंड होईपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना याची कल्पना आली नाही का या प्रश्नावर सातत्याने चर्चा झाल्याचं पहायला मिळालं. मात्र याच प्रश्नावरुन आता उद्धव यांचे पुत्र आणि युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट करताना शिंदेंनी यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याची चाहूल दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागली होती असं विधान केलं आहे.
नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तांतरणासंदर्भातील नाना पाटेकरांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही जर…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा