आज राज्यपालांनी जे भाषण केलं त्यात महाविकास आघाडीच्या काळातलीच कामं आणि निर्णय होती. राज्यपालांचं भाषण ऐकून आम्हाला असं वाटलं की त्यांची दिशाभूल वगैरे केली का? असं आम्हाला वाटलं आहे त्याबाबत आम्ही माहिती घेणार आहोत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर एकनाथ शिंदे काहीही म्हणू द्या.. त्यांनी सहा महिन्यात बारावं कारण दिलंय पण एक लक्षात घ्या की गद्दार हे गद्दारच असतात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेबाबत?

एकनाथ शिंदे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, तसंच त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी होती. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मागच्या सहा महिन्यात गद्दारी करण्याचं हे बारावं कारण दिलं आहे. त्यामुळे आता काय बोलणार? एक लक्षात घ्या जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार त्यांच्यावरचा तो शिक्का पुसला जाणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ajit Pawar On Raigad DPDC Meeting
Ajit Pawar : महायुतीत धुसफूस? ‘डीपीडीसी’च्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर; अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही आमदारांना…”
eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
MLA Jitendra Awhad reaction after badlapur rape case accused akshay shindes parents withdraw the case
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “…तर अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार, हे नक्की”
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

गद्दारांनी काहीही आश्वासनं पाळली नाहीत

जे गद्दार बोलत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. विविध घोषणा महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये झाल्या आहेत. विविध वचनं देण्यात आली मात्र गद्दारांनी काहीही वचनं पूर्ण केली नाहीत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या प्रांगणात आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच त्यांना पक्ष कार्यालयाचं काय होणार? असं विचारलं असता आता लवकरच आम्ही तुमच्यासोबत येऊन बसतो असंही त्यांनी मिश्कीलपणे म्हटलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?

सभागृहात आम्ही जिथे बसायचं तिथेच बसलो होतो, गद्दार कुठे गेलेत ते त्यांनाच विचारा असं म्हणत आणखी एक टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना लगावला आहे.

Story img Loader