शिवसेनेने ( ठाकरे गट ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं फेरबदल केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून आमदार वैभव नाईक यांना हटवलं आहे. खासदार विनायक राऊत यांनी ही उचलबांगडी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. पण, तीनही सदस्य पूर्वीचे राणे समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

“ठाकरे सेना राणे समर्थकांकडेच आहे. आमचे सर्व माजी समर्थक ठाकरे सेनेचं नेतृत्व करतात. त्यातील तीन मधून दोन तर शिंदे गटात जाण्यासाठी एका पायावर तयारीत आहे. तिसरा आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आमच्यावर आहे. आम्ही ठरवू तेव्हा व्हेंटिलेटरची वायर काढून टाकू,” असं विधान नितेश राणेंनी केलं आहे. याला आता वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?

हेही वाचा : वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी, शिंदे गटात जाणार? म्हणाले…

प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, “नितेश राणेंचं अस्तित्व एवढं मोठं नाही की, त्यांच्या संपर्कात कोण असेल. त्यांचेच कार्यकर्ते भाजपा आणि रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राणेंचं जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व संपत चाललं आहे. राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळावं.”

“शिवसेनेचे कार्यकर्ते कितीही अडचणी आल्या तरीही पक्षाबरोबर ठाम राहिले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोणीही फोडू शकणार नाही. कारण, विश्वासाने ते उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत,” असं वैभव नाईक यांनी सांगितलं.

हेही वाचा : “दौंडमधील भीमा साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार”, संजय राऊतांचे थेट फडणवीसांना पत्र; म्हणाले, “किरीट सोमय्यांच्या…”

“दोन महिन्यांत राणेंना मंत्रीपदाचा…”

“नारायण राणेंचं राजकीय अस्तित्व भाजपा ठरवणार आहे. यापूर्वी राणे लोकांचं आणि पक्षाचं अस्तित्व ठरवत होते. आता परिस्थिती बदलली आहे. महिन्यापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेला भाजपाचा मेळावा, ही राणेंना वगळून वाढलेली ताकद दाखवण्यासाठी होता. भाजपाला राणेंची गरज संपली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत राणेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे,” असं भाकीत वैभव नाईक यांनी वर्तवलं आहे.

Story img Loader