महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावरून आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसह अन्य निवडणुकांशी सुद्धा याचा संबंध जोडला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी या भेटीचे नेमके कारण काय होते, याबाबत माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे यांनी कोकण महामार्गाच्या संदर्भात माझी भेट घेतली होती. कारण कोकण महामार्गाचं काम जरा अर्धवट असल्याने, ते नुकतेच तिकडून आले तर ते म्हणाले की मला असं वाटलं तुम्हाला भेटून हे सांगावं, की काम वेगानं झालं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. काही काँट्रॅक्टरच्या अडचणी होत्या त्या त्यांनी दूर केल्या. ते स्वत:ही गडकरींशी बोलणार आहेत आणि आम्हीदेखील ते काम कसं वेगाने पूर्ण होईल तसा प्रय़त्न करणार आहोत.”

CM Devendra Fadnavis on Meeting with MNS chief Raj
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

हेही वाचा – “जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्यासाठी …”- महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं विधान!

कोकण दौऱ्यावर असताना राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांवरुन टोलेबाजी करताना “गेल्या दोन-अडीच वर्षांपासून निवडणुकांची पाईपलाईन तुटली आहे” असं राज ठाकरे म्हणाले होते. याशिवाय आगामी वर्षात फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणुका होण्याचा कयासही त्यांनी वर्तवला होता. तर येत्या जानेवारीमध्ये पुन्हा कोकण दौरा करणार असल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं होतं. या दौऱ्यात मराठी माणूस, हिंदुत्वासह राज्यातील अनेक विषयांवर भूमिका मांडणार असल्याचं ते म्हणाले होते.

Story img Loader