राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज दिवसभर पथकाकडून चौकशी सुरू होती. बारा तासाच्या चौकशीनंतर ईडीचे पथक मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले. त्यांनी बरीचशी कागदपत्रे हाती घेतल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत त्यांनी माध्यमांची कसलाही संवाद साधला नाही.

हेही वाचा- ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे पुत्र आक्रमक, म्हणाले “…तोपर्यंत कोणी केसालाही धक्का लावू शकणार नाही”

madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…

मुश्रीफ समर्थक एकत्र

ईडीचे पथक परतल्यानंतर लगेचच मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्ते जमले. त्यांच्यासमोर बोलताना गोकुळचे संचालक नावीद मुश्रीफ यांनी ‘पथकाला योग्य ती उत्तरे दिली आहेत. त्यांना साधा कपटाही सापडला नाही. आकसातून कारवाई केली होती. कागलमध्ये छापा पडणार असल्याची चर्चा होती. मात्र जनतेचे पाठबळ आहे तोवर आमच्या केसालाही धक्का लागणार नाही. अशा कारवायांना मुळीच घाबरणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा- अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, हसन मुश्रीफांचा उल्लेख करत म्हणाले “त्यांची जबान…”

जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केली. कोणीतरी सांगते म्हणून आजची कारवाई झाली. व्यापाऱ्यांवर कारवाई झाली की लोक पळून जातात पण आज हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होत असताना हजारो लोक जमून त्यांनी कारवाईवर आक्षेप घेतला. लोकशाहीमध्ये पराभव करता येत नाही या रागातून षंढ प्रवृत्तीचे माणसे अशी कारवाई करायला लावतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader