चिन्मय पाटणकर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा अचानक विद्यार्थिसंख्या का वाढली, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.

Important Clarification of State Board regarding 10th and 12th Exam Time Table
दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण… नेमके झाले काय?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Increase in 11th seats in Eklavya residential schools nashik news
एकलव्य निवासी शाळांमध्ये अकरावीतील जागांमध्ये वाढ
medical college, Maharashtra ,
नव्याने मंजूर वैद्यकीय महाविद्यालयात चालू सत्रातच प्रवेश, राज्यात एमबीबीएसच्या ८०० जागा…
applications 10th exam, Maharashtra State Board,
दहावीच्या परीक्षेचे अर्ज कधीपासून भरता येणार? राज्य मंडळाने दिली माहिती
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
Mahajyoti, MPSC, MPSC examination,
‘एमपीएससी’ परीक्षेत ‘या’ संस्थेच्या १५१ विद्यार्थ्यांनी मारली बाजी, उपजिल्हाधिकारी पदी विनीत शिर्के
Primary teachers across the state on leave for protest tomorrow
राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर… शाळा बंद राहणार?

राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. दर वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थी, तर बारावीसाठी सुमारे १४ लाख ६० हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी दहावीच्या १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हेही वाचा >>>विद्यार्थी आंदोलनांवर टाच आणणारी प्रस्तावित कार्यपद्धती स्थगित; विद्यार्थी संघटनांशी चर्चेनंतर विद्यापीठाचा निर्णय

या पार्श्वभूमीवर यंदाच्या नोंदणीमध्ये विद्यार्थिसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दहावीची विद्यार्थिसंख्या १६ लाख १० हजार जास्त, तर बारावीची विद्यार्थिसंख्या १५ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. तसेच अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत असल्याने विद्यार्थिसंख्येत भरच पडणार आहे. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थिसंख्या का वाढली, त्या मागे अन्य काही विशेष कारणे आहेत का, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपूर्वी दहावीचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात आले होते. त्यामुळे निकालात वाढ झाली होती. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थिसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. पण दहावीचे सुमारे २५ हजार विद्यार्थी वाढल्याचे दिसून येत आहे. ते का वाढले आहेत, याचा अभ्यास करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत परीक्षा पद्धतीमध्ये बदल प्रस्तावित करण्यात असल्याने खासगी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असू शकते.- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ