सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. अचानक हे अधिवेशन बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले की, “इंडिया दिवसेंदिवस मजबूत होत असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महागाई , बेरोजगारी, सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती यांसारखे जनतेचे मूळ मुद्दे आता चर्चेत येत असल्याने लोकांना भाजपा सरकारचा खरा चेहरा कळायला सुरुवात झाली आहे.”

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Rahul Gandhi On Budget 2025
Rahul Gandhi : “ही तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी”, अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”

हेही वाचा >> सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन, ऐन गणेशोत्सवात कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

‘परिणामी , गेली दहा वर्षे जनतेला गृहीत धरून चालणाऱ्या केंद्र सरकारला सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा साक्षात्कार झाला, येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करणे यासारखे अजून खूप सारे साक्षात्कार होतीलही”, अशीही टीका रोहित पवारांनी केली.

“निवडणुकांना जेवढा उशीर होईल, पराभव देखील तेवढाच मोठा होईल हे भाजपला कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांना सरकारचा खरा चेहरा समजण्यासाठी इंडिया अधिक मजबूत होण्यासाठी अधिकचा वेळ मिळू नये, यासाठी भाजपा प्रयत्नशील असून लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कदाचित त्यामुळेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज पडली असेल, हे नाकारता येणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी केली तारीख बदलण्याची मागणी

“१८ -२२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाविषयी नुकतीच माहिती मिळाली. या अधिवेशात अर्थपूर्ण चर्चा आणि संवाद होईलच. पण महाराष्ट्रात याच काळात गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या तारखेबाबत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री विचार करतील”, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Story img Loader