महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे खोके सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. महागळती सरकार आहे. या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. सगळी जनता यांना बाय बाय सरकार म्हणते आहे अशी टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात उद्या गाजर संकल्प

अर्थसंकल्पाबद्दलही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. घोषणांचा पाऊस पडेल. मात्र तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो हे मी कायमच म्हणत असतो. या सरकारमध्ये हिंमत असेल तर गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे. एवढंच नाही तर त्यासंबंधीची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. ही श्वेतपत्रिका जर या सरकारने काढली तर तो एक कोरा कागद असेल असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis
“ना ना करते प्यार…”, लिफ्टमधील फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले, “गुप्त बैठका…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
uddhav Thackeray chandrakant patil
चंद्रकांत पाटलांनी विधान भवनात घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंची टोलेबाजी, “एकनाथ शिंदे यांची शेती पंचतारांकित! अमावस्या, पौर्णिमेला…”
Eknath shinde ajit pawar (2)
महायुतीत जुंपली; “आम्हाला हलक्यात घेऊ नका”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा, शिंदेंच्या आमदारानेही सुनावलं

लाज, लज्जा, शरम नसलेलं सरकार

या सरकारला खोके सरकार, महायुती सरकार म्हणतात. पण केंद्र आणि राज्याचं डबल इंजिन सरकार म्हणजे महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली आहे. पेपरही फुटत आहेत. तरीही यांना लाज, लज्जा, शरम वाटत नाही. आम्ही प्रश्न मांडले की आमच्यावर आरोप होत आहेत. आमच्याकडून काही प्रश्न उपस्थित केले जातीलच. मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे ती आपल्याच माध्यमांतून आम्हाला समजतं आहे. राज्यातले शेतकरी ही परिस्थिती भोगत आहेत. सरासरी रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतो आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना या खोके सरकारने लवकरात लवकर कर्जमुक्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची टोलेबाजी, “एकनाथ शिंदे यांची शेती पंचतारांकित! अमावस्या, पौर्णिमेला…”

शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. एक रुपयात पीक विम्याची घोषणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र काही शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७० रुपये आले आहेत. शेपटावर निभावलं. कसंबसं एनडीए सरकार आलं. डबल इंजिन सरकारने पीक कर्जमुक्ती लगेच द्यावी. मी दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची रक्कम माफी दिली होती. घोषणा आणि थापा मारू नका. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून निवडणुकीच्या आत कर्जमुक्ती द्यावी. फडणवीस यांनी एक कर्जमुक्ती केली. तिची अंमलबजावणी अजून नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘लाडकी बहीण’प्रमाणेच ‘लाडका भाऊ’ योजनाही आणा

डबल इंजिन सरकारने केंद्रातल्या सरकारची मदत घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना आणा. या योजनेत स्त्री आणि पुरुष भेद करु नका. कर्ता पुरुष असतो तसं अनेक घरांमध्ये कर्ती महिलाही असते. चंद्रकांत पाटील आज मला चॉकलेट देऊन गेले. तसंच मोफत शिक्षणाचंही चॉकलेट दिलं होतं ती योजना पोकळ ठरली आहे. आता लोकांची सहनशक्ती संपली आहे. गाजर दाखवून तुमचं काम होणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.