वाई : बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावाने मते मागितली म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता आता तर सर्रास हिंदुत्वाच्या नावाने मते मागितली जातात. मात्र यावेळी कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. ज्यांच्या हातात अधिकार आहे त्यांनी संविधान आणि घटनेचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या राज्य सरकारची आर्थिक ओढाताण सुरू आहे. आर्थिक पाहणी अहवालात तर महाराष्ट्राची पीछेहाट होत असल्याचे दिसून येते. जनतेच्या पैशातून सरसकट करोडो रुपये जाहिरातीवर खर्च होत आहे .या जाहिरातीमुळे लोकांना यांची तोंडी पहायची नसली तरी सुद्धा पहावी लागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असल्याचे फडणवीस कर्नाटक मध्ये बोलण्याचे निदर्शनास आणून दिले असता ते नेहमी विरोधी पक्षांना कमी लेखण्याचे काम ते नेहमी करत असतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या राज्यात विरोधी पक्षच नाही असेही ते म्हणाले. त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं कारण नाही. जर ३६ जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यातले असू तर मग त्यांच्यासमोर कुणी विरोधकच दिसत नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातलेच आहोत. काँग्रेसबद्दलपण ते तेच म्हणत असतात. काँग्रेस संपवली पाहिजे अशीच भाजपाची वक्तव्यं असतात, असं अजित पवार म्हणाले.

arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
Mamata Banerjee fb
Kolkata Rape Case : कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश, ममता बॅनर्जींकडून तीन प्रमुख मागण्या मान्य, तरीही आंदोलन चालूच राहणार
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकांनंतरही आमच्या सरकारला धोका नाही, असे म्हणाले होते. त्यावर ते म्हणाले, सत्तेत असताना कोण म्हणेल की आमच्या सरकारला धोका आहे. सरकार असेपर्यंत सगळे असंच म्हणणार. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुंतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापेक्षा नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष द्यावे असा मार्मिक टोला  अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात गुंतण्यापेक्षा बांधावर जाऊन बळीराजाचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवले पाहिजेत. जर निधी उपलब्ध नसेल तर वित्त विभागाशी बसून ते चर्चा करून सोडवायला पाहिजेत. शेतकऱ्यांच्या फळबागा आणि उन्हाळी पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली आहेत. पण एकनाथ शिंदे हे त्यांच्या चाळीस आमदारांच्या गटाचे नेते आहेत तसेच ते महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी सुद्धा आहेत त्यामुळे दुसऱ्या राज्याचा प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यांमध्ये बळीराजा किती पीडित अवस्थेत आहेत याची गांभीर्य ओळखून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत प्रचार महत्त्वाचा नाही जितके शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.