अलिबाग: कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर इनोव्हा गाडीला अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य आणि पत्रकार धर्मानंद गायकवाड हे आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह नेरळ येथे इनोव्हा गाडीने घरी परत येत होते. पहाटे सव्वा तीन वाजता त्यांची गाडी कर्जत कल्याण राज्य रस्त्याने नेरळकडे येत असताना हा अपघात झाला.

Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Car, ST buses hit, flyover , Nagpur,
नागपुरात उड्डाणपुलाखाली कार, एसटी बसेस परस्परांवर धडकल्या, ९ प्रवासी जखमी
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
Cracks appear in Butibori overbridge, closed for traffic
निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला, गडकरींवर नामुष्कीची वेळ!, ‘एनएचआय’ने हात झटकले, आमदाराचे मौन
Woman killed five injured in horrific accident on Samruddhi Highway Nagpur news
समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी

हेही वाचा >>> जन्मठेपेची शिक्षा सोडून तब्बल १७ वर्षं होता फरार; लग्नही केलं, संसारही थाटला…

चालक धर्मानंद गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या पुलावरून थेट खाली ३० फूट कोसळली. त्याच वेळी पनवेल येथून कर्जतकडे एक मालवाहू गाडी प्रवास करीत होती. त्यामुळे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरून कोसळलेली गाडी थेट मालवाहू गाडीवर कोसळली. त्यात मालवाहू गाडीचे कपिलग तुटले आणि त्यामुळे मालगाडी अपघातग्रस्त झाली.

यात पत्रकार धर्मानंद यशवंत गायकवाड, मंगेश जाधव, नितीन जाधव यांचा मृत्यू झाला. तर संतोष सखाराम जाधव, पत्रकार जयवंत रामचंद्र हबाळे हे जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथे पाठविण्यात आले होते.

पत्रकार आणि राजकारणी

धर्मानंद गायकवाड यांचे मूळ गाव कर्जत तालुक्यातील आसल हे असून त्यांनी नोकरीच्या निमित्ताने नेरळ येथे राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर नेरळ गावाचे रहिवासी झालेले धर्मानंद यांनी नेरळ ग्रामपंचायतची निवडणूक लढवली असता ते विजय मिळवून ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेली चार वर्षे कार्यरत होते. त्याच वेळी आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तर पत्रकार म्हणून गेली २२ वर्षे रायगड टाइम्ससारख्या वृत्तपत्रात काम करीत असून रायगड प्रेस क्लब या संघटनेत जिल्हा उपाध्यक्ष, तसेच कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे.

Story img Loader