उस्मानाबाद येथे मागील दहा दिवसात झालेल्या पावसासह परतीच्या पावसानेही नळदुर्ग परिसरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक धबधबे सुरु झाले आहेत. उस्मानाबाद, लातूरसह सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नळदुर्ग किल्ल्यात यंदा करोनामुळे पर्यटक नाहीत. त्यामुळे अनलॉक-5 मधील पर्यटनाबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

अतिवृष्टीमुळे नळदुर्ग येथील बोरी धरण तुडूंब भरले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून सांडवा सुरू झाला आहे. याचा परिणाम म्हणून नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले प्रेक्षणीय व नेत्रदीपक नर-मादी व शिलक हे दोन्ही धबधबे आज (मंगळवार) वाहण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र सध्या करोनामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला १५ मार्चपासून पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटकांना हे दोन्ही धबधबे वाहताना पाहता येणार नाहीत. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहताना पाहणे म्हणजे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून घेण्यासारखे आहे. अतिशय नेत्रदीपक व प्रेक्षणीय धबधबा म्हणून नर-मादी धबधब्याची ओळख आहे. या धबधब्यामुळे किल्ल्याचे सौंदर्य अधिकच वाढले आहे.

11 February 2025 Horoscope In Marathi
११ फेब्रुवारी राशिभविष्य: पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ४ राशींना मिळणार भरपूर सुख; तुमची रास असेल का भाग्यवान?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Four lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi
टाळ-मृदंग, विठ्ठलनामाने दुमदुमली पंढरी!
Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
The Hindu Lunisolar Calendar information in marathi
काळाचे गणित : बिनमहिन्यांचं वर्ष!
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
Fish drought like conditions Dapoli coast strong wind speed fish trade
दापोली किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती, जोरदार वाऱ्याच्या वेगामुळे मच्छीची करोडो रुपयांची उलाढाल थांबली
increase in Rabi crop sowing country farming farmers
देशातील रब्बी पेरण्यांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या, पेरा किती हेक्टरने वाढला, गव्हाचे क्षेत्र किती

किल्ल्यातील नर-मादी व शिलक हे दोन्ही धबधबे वाहण्याची शक्यता फार कमी वाटत होती. कारण पावसाळा संपत आला तरी या भागात पाऊसच नव्हता. त्यामुळे बोरी धारण व बोरी नदीत अतिशय कमी पाणीसाठा होता. मात्र पुन्हा एकदा परतीचा पाऊसच मदतीला धाऊन आला आणि अवघ्या दहा ते बारा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे बोरी धरण १०० टक्के भरून धरणाचा सांडवा सुरू झाला. या सांडव्यामुळे बोरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि पर्यटकांच्या आवडीचे दोन्ही धबधबे सुरू झाले आहेत.

Story img Loader