विरार मधील बहुचर्चित समय चौहान हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी गोळीबार करणार्‍या दोन कुख्यात गुंडाना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या हत्या प्रकरणातील एक आरोपी आठवड्याभरापूर्वीच पोलीस चकमकीत मारला गेला आहे.

विरारमध्ये राहणार्‍या समय चौहान या व्यावसायिकाची २६ फेब्रुवारी रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना मिळाले होते. त्यात दोन मारेकरी दिसत होते. परंतु ते कोण, कुठून आले याचा काहीच उलगडा होत नव्हता. या प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते. शिवसेना नेते सुदेश चौधरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. हल्लेखोरांच्या अटकेसाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. स्वत: पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील हे पोलीस निरिक्षक प्रफुल्ल वाघ आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्यासह उत्तर प्रदेशात आरोपींच्या शोधासाठी गेले होते. मंगळवारी वाराणसी जिल्ह्यातील चित्तापूर चौकातून पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या मदतीने राहुश शर्मा आणि अभिषेक सिंग यांना अटक केली आहे. याप्रकरणातील तिसरा आरोपी मनिष सिंग या २१ मार्च रोजी उत्तर पोलिसांबरोबर झालेल्या पोलीस चकमकीत मारला गेला होता. तर चौथा आरोपी फरार आहे

Thackeray group alleges that police are ready to implicate Deepak Badgujar in Ambad firing case
अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Rane made controversial statement about Muslim religious
ठाणे :आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Prime Minister Narendra Modi said efforts to strengthen relations between India and Brunei
ब्रुनेईबरोबर संबंध दृढ करण्याचे प्रयत्न; पंतप्रधान मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर
Somnath Gaikwad arrested in Vanraj Andekar murder case Pune news
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत
Jagdish Tytler indicted after 40 years in anti-Sikh riots case
शीखविरोधी दंगलप्रकरणी जगदीश टायटलर यांच्यावर ४० वर्षांनी दोषारोप… काय होते प्रकरण?
Chandrapur, Wekoli, electronic weighing machine, fraud, crores of rupees loss, electronic chip, Ramnagar police, Faiz Traders, Vekoli employees,
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा

३ हत्या आणि ९ वर्षांपासून फरार

पोलिसांनी अटक केलेला राहुल शर्मा हा कुख्यात गुंड असून त्याने ३ हत्या केल्या आहेत. मागील ९ वर्षांपासून तो फरार होता. त्याने वांद्रे येथे अजिल शेख आणि विजय पुजारी तर भाईंदर मध्ये बंटी प्रधान या तिघांच्या हत्या केल्या होत्या. या दोन्ही आरोपींना बुधवारी वसईत आणले जाणार आहे. त्यांना नेमकी कुणी हत्येची सुपारी दिली ते पुढील चौकशीत स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

..अखेर सत्याचा विजय झालाच

या प्रकरणात शिवसेना नेते सुदेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले होते हे आता सिध्द झाले आहे. सत्याचा उशीरा का होईना विजय होतोच, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी सत्य शोधून काढले आणि मला नाहक अडकविणार्‍यांना सणसणीत चपराक दिली आहे, असे त्यांनी सांगितले.