शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी दुपारी यवतमाळमधील बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द येथे घडली. आकाश राजेंद्र दुधकोर (१५), चेतन सुरेश मसराम (१६) अशी मृतांची नावे आहे. शेततळ्यात गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
ते दोघेही नांदुरा खुर्द शेत शिवारातील एक शेतकऱ्याच्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते . काम संपवून घरी परत येत असताना त्यांना पाण्याने भरलेले शेततळ दिसले. त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने त्यात ते अडकले. दोघेही पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेवून शेततळ्यात बुडालेल्या मुलांना बाहेर काढले. मात्र तो पर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
First published on: 20-07-2021 at 21:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two school children drown in pond msr
Show comments