प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज यांनी आमदारकीबाबत भाष्य केलं आहे. आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज लागतात, इंदुरीकर महाराज यांनी केली आहे. जळगावातील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात बोलत होते.

इंदुरीकर महाराज म्हणाले, “आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज, १००-२०० पतसंस्था, १००-१५० बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा आमदार होता येतं. पण, मंगेश चव्हाण जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत.”

Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
Devendra Fadnavis Ask Question to Sharad pawar
Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis Trolled For His Statement
Devendra Fadnavis : “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं नाही, काँग्रेसने…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन ट्रोलिंग, कोण काय म्हणालं?
March in Dhule for Devendra Fadnavis to implement his promises
देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी धुळ्यात मोर्चा
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”

हेही वाचा : “इंदुरीकरांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा…”, लिंगभेद वक्तव्याप्रकरणी अंनिसचा हल्लाबोल

“कोण कोणत्या पक्षात आहे? कळेना”

“आता कोणताही पक्ष राहिला नाही. कोण कोणत्या पक्षात काम करतो, हे कोणालाच कळेना झालं आहे. पक्ष कोणताही असुद्या आपली माणसं आपल्याला सांभाळायची आहेत,” असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं.

हेही वाचा : लावणी भुलली अभंगाला

“शेतकऱ्यांनी शेळ्या विकून सोयाबीन अन् कापसाची लागणी केली, पण…”

“शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. पेरलेलं पीक उगवणार यांची शाश्वती नाही. १५ दिवस झाले हवामान खाते पावसाची बातमी देईना. शेतकऱ्यांनी शेळ्या विकून सोयाबीन आणि कापसाच्या पिकांची लागणी केली. पण, आता पाऊसच आला नाही. आता माणूस कापसाकडं पाहतो आणि कापसाचे झाड माणसाकडं पाहते,” असेही इंदुरीकर महाराज यांनी सांगितलं.