सांगली : जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन तरुण ठार झाले असून एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

हेही वाचा >> तब्बल ५० वर्षांचा लढा, पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत पत्र व्यवहार, वाचा उंद्री गावाच्या नामांतराचा भन्नाट किस्सा

Pune, young man murder Dhayari, Dhayari,
पुणे : ताटात हात घातल्याने तरुणाचा खून, धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Three youths drowned in lake pit during Devi Visarjan at Savari Tola Complex in gondiya
देवी विसर्जनादरम्यान तलावातील खड्ड्यात पडून तिघांचा मृत्यू
after nalganga dam overflowed water entered in malkapur and near villages houses damaged
नळगंगा धरणाची तीन दारे उघडल्याने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार! अनेक घरांत पाणी शिरले
Three people died after a car hit Shivshahi in Jalgaon district nashik
जळगाव जिल्ह्यात शिवशाहीवर कार आदळल्याने तिघांचा मृत्यू
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
father thrown his two dauthers in river in buldhana district
पोटच्या लेकींना पित्याने नदीत फेकले
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार कोसारी येथील चार तरुण एका दुचाकी वरुन जतहून गावी निघाले होते. बिरनाळ ओढ्याजवळ वळणावर दुचाकी वरील चालकाचा ताबा सुटला. या अपघातात दुचाकी चालवत असलेला अजित भोसले (वय 22) हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेले मोहीत तोरवे (वय 21) आणि राजेंद्र भाले (वय 22 )यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

हेही वाचा >> विदर्भात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण; राज्यात मान्सूनची स्थिती काय?

या अपघातात संग्राम तोरवे (वय 16) हा गंभीर जखमी झाला असून त्याला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ठार झालेल्या तरुणांच्या पार्थिवावर रविवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.