पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुंबईतील निवास्थानावर ईडीने धाड टाकली आहे. वारंवार नोटीस बजावूनही राऊत टाळाटाळ करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही राऊतांना याच भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात लोकप्रतिनिधींनी बोलू नये, असा सल्ला बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिला आहे.

हेही वाचा- विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

Commissioners reaction on action taken against unauthorized constructions and sheds in Kudalwadi
कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईबाबत आयुक्तांचे मोठे विधान, म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Marathi mandatory in government offices news in marathi
सरकारी कार्यालयात ‘मराठीतच बोला!’ कर्मचारी मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
‘जीबीएस’ग्रस्त गावांना शुद्ध पाणी कठीणच? वाढीव कोटा मंजूर नसल्याने प्रश्न; महापालिका-जलसंपदा विभागात वाद
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?

तपास यंत्रणेच्या कारवाईत लोकप्रतिनिधींनी बोलणे चुकीचे

“शिवसनेकडून ही कारवाई सुडबुद्दीने करण्यात येत असल्याची टीका करण्यात आली आहे. हे त्यांच व्यक्तिक मत असू शकते. परंतु केंद्राची किंवा राज्याची एखादी तपास यंत्रणा कारवाई करत असेल त्यावर लोकप्रतिनिधी म्हणून बोलणं उचित नाही. संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरत असतं. त्यामुळे त्यावर जास्त बोलणं योग्य नाही”. आम्हीसुद्धा बाळासाहेबांचाच विचार घेऊन राजकारण, समाजकारण करतो. त्यामुळे कितीही ईडी कारवाई झाली तरी शिवसेना सोडणार नाही, बाळासाहेबांचा लढाऊपणा सोडणार नाही. असं म्हणाऱ्या संजय राऊतांनाच याचा अर्थ माहिती असेल”, असेही सामंत म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा- “यापूर्वीच त्यांना अटक व्हायला हवी होती”; ईडी कारवाईनंतर नवनीत राणांची राऊतांवर टीका

मी ईडीचा अधिकारी नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

“संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी होऊ द्या. त्यांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही. त्यामुळे ‘कर नाही त्याला डर कशाला’ असायला हवी. ते ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकासआघाडीचे मोठे नेते होते. दरदिवशी ९ वाजता तुम्ही त्यांची बाईट घेत होते.” “राऊतांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

Story img Loader