महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महाजन समितीने केलेल्या चुकांमुळे सीमाप्रश्न चिघळला असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…म्हणून बोम्मईंनी सीमावाद काढला, हे सगळं स्क्रिप्टेड आहे”, संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप!

Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

“सीमाप्रश्नासंदर्भात जी महाजन समिती नेमण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चुकांमुळे आज आपल्या त्रास होतो आहे. त्यांच्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे केंद्रशासनाने दोन्ही राज्याच्या प्रमुखांना बोलावून एक बैठक घ्यावी आणि त्यातून मार्ग काढावा”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, सीमाप्रश्नावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपसंदर्भात विचारलं असता, मला बाबतीत सध्या काही बोलायचं नसून मी २८ नोव्हेंबर रोजी सविस्तर भूमिका मांडेन, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Video: “याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज?” उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपाचं टीकास्र!

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. राज्यातील शिंदे सरकार कमकुवत असल्यानेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांवर दावा सांगितला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर राज्यातील एक इंच जमीनही कर्नाटकमध्ये जाणार नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

Story img Loader