शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ( २७ ऑगस्ट ) हिंगोलीत सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, राज्यातील शिंदे सरकार आणि आमदार संतोष बांगर यांचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनाही लक्ष्य केलं. हे उपरे नेते येत आहेत, त्यांना सांगा आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “काहीजण बाहेर राज्यातून येत आहेत. जणू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही. एकतर त्यांच्या आणि आपल्या भाषेत फरक आहे. ‘अब आयेगी किसान सरकार’ असं घोषवाक्य त्याचं आहे. हे जे उपरे नेते येतात त्यांना सांगा, आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही.”

Supriya Sule slams Ajit Pawar group on Pune Accident
Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
Amitabh bachchan Jaya Bachchan
अमिताभ बच्चन यांच्या अफेअर्सबद्दल बोलायला त्यांच्या सासऱ्यांना आलेलं निमंत्रण, ‘अशी’ होती जया यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
Badlapur sexual assault case, Akshay Shinde Encounter
Akshay Shinde Encounter : पोलीस अधिकाऱ्यांचा शिंदे गटाकडून सत्कार
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “राहुल गांधी यांच्या जिवाला धोका आहे, त्यांच्यावर हल्ला…”, संजय राऊत यांचा आरोप

हेही वाचा : “मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का?” उद्धव ठाकरेंच्या टीकेला बांगर प्रत्युत्तर देत म्हणाले…

“भाजपाची सुपारी घेऊन हे मते फोडण्यासाठी येत असतील, तर पहिलंच सांगतो, तुमचं घर आधी सांभाळा. कारण, तुमच्या घरात बुडाला सुरूंग लागला आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्यावर केली.

हेही वाचा : “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

“शेतकरी हवालदील झाला आहे. आपला हिंगोलीत कार्यक्रम असताना पलीकडे ‘सरकार आपल्या दारी’ सुरू आहे. ‘सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी.’ हे थापा मारणारे सरकार आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. तरी, अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताचं चिरडून टाकायचं, एवढंच काम इथे बसलेले आणि दिल्लीत यांचं मायबाप बसलेत, ते करत आले आहेत,” असं टीकास्र शिंदे आणि मोदी सरकारवर उद्धव ठाकरे यांनी सोडलं.