शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत जाहीर सभेत बोलताना राज्यातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. गेल्या अडीच वर्षांपासून अर्थात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून ही त्यांची पहिलीच जाहीर राजकीय सभा ठरली होती. त्यामुळे या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सभेतील भाषणात अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच, काही ठिकाणी त्यांनी टोलेबाजी देखील केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मातोश्रीवर काय घडलं, याविषयीची आठवण सांगितली.

बाबरी मशिद प्रकरणावरून फडणवीसांवर निशाणा

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बाबरी मशीद प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. बाबरी पडली, तेव्हा मी तिथे होतो, असं विधान काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केलं होतं. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी टीका केली. “ते म्हणतात बाबरीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते नव्हतेच, मी गेलो होतो. तुमचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा शाळेची सहल गेली होती का तिथे? तुमचं वय काय? बोलता किती? तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…

दरम्यान, यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खोचक टोला देखील लगावला. “तुम्ही नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती. लोकांना श्रमच करायला लागले नसते. तुम्ही एक पाय टाकला असता तरी बाबरी खाली आली असती. आता हे म्हणतायत ती मशीद नव्हती. तो ढांचा होता. मग तेव्हा एवढं टिपेला का सांगितलं मंदीर पाडून मशीद बांधली?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता.

Uddhav Thackeray BKC Rally : “…तर महाराष्ट्र असा पेटेल, की तुम्हाला पळता भुई थोडी होईल”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं आव्हान!

‘त्या’ दिवशी मातोश्रीवर काय घडलं?

६ डिसेंबर रोजी मातोश्रीवर काय घडलं, याची आठवण यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितली. “बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांना सांगितलं की साहेब बाबरी पाडली. ते म्हणाले काय सांगतो? बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला. त्यांनी उचलला. समोरच्या माहितीवर ते म्हणाले, मग? जर शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. फोन ठेवल्यावर बाळासाहेब मला म्हणाले ही कसली यांची औलाद. जे लोकांना कारसेवा करायला बोलवत आहे. हे असलं पुचाट नेतृत्व आहे. नेतृत्वाचं लक्षण हेच असतं. जो नेता लोकांना भडकवून त्याने सांगितलेलं काम केल्यावर जबाबदारी झटकतो, तो नेता असूच शकत नाही. हेच काम भाजपानं केलंय. सुंदरसिंग भंडारी तेव्हा हेच म्हणाले होते की हे आम्ही केलेलं नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Story img Loader