ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होती. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीविरोधात निवडणूक लढवावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Maharashtra Assembly Election , Konkan ,
विधानसभेतील पराभवानंतर कोकणात उद्धव ठाकरे गटाला गळती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

हेही वाचा- VIDEO: कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या अन् धुराळा; लँडिंग न करताच बीएस येदियुरप्पांचं हेलिकॉप्टर माघारी फिरलं

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “हे पाहा, याबाबत आता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू… आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात.”

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर राहण्यास आम्ही सांगितलं होतं, पण…”, दीपक केसरकरांचं विधान

“पण शेवटी या देशातला मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येतं. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे,” असंही राऊत म्हणाले. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Story img Loader