निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षाचे शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. चोर हा शेवटी चोरच असतो. त्यांना शिवसेनेचे चिन्ह कागदोपत्री मिळालेले असले तरी खरा धनुष्यबाण आमच्याकडेच आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच नामर्द कितीजरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते आज (१७ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : लोकशाहीत टीका अविभाज्य घटक
bjp spokesperson sujay pataki article
पहिली बाजू : ही सत्यअसत्याची लढाई आहे!
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Women who are part of the crowd need self-awareness
हे आत्मभान कधी येईल?

“धनुष्यबाण चिन्ह ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते घेता येणार नाही. कारण शिवसेनेचे धनुष्यबाण शिवसेनाप्रमुखांच्या पूजेतील आहे. आता तिकडे जल्लोष सुरू असेल. आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. पण शेवटी चोर तो चोरच असतो. ज्याच्यामध्ये स्वत: काही करण्याची काही मर्दानगी नसते, तो नामर्दच असतो. नामर्द कितीजरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. हेच सत्य आहे,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

शेवटी चोरबाजारालाच जर मान्यता मिळणार असेल तर…

“आम्ही लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊद्या. धनुष्यबाण चोरल्याचा त्यांना आनंद मिळू द्या. शेवटी चोरबाजारालाच जर मान्यता मिळणार असेल तर बाकीच्या बाजाराला अर्थ राहत नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.