गेल्या जवळपास वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, तरीही हिंसाचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. यातच आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उसाळून आला आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलं?

मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’ अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत. पण महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे, तर हा संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’ आहे. तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो ‘अनसेफ’ करीत आहात. मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्यदेखील आज वांशिक भेद आणि त्यातून उफाळणाऱ्या हिंसाचाराने असुरक्षित बनले आहे ते तुमच्याच राजवटीमुळे. त्यामुळे आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका

मणिपूर हे मागील दीड वर्षापासूनच वांशिक हिंसेच्या वणव्यात होरपळते आहे. तेथे जाऊन हा वणवा विझवावा असे ना पंतप्रधानांना वाटते, ना केंद्रीय गृहमंत्र्यांना. त्यामुळे काही काळ वरकरणी शांतता दिसते, परंतु एखाद्या घटनेच्या निमित्ताने कुकी आणि मैतेई या दोन समाजांत खदखदत असलेला ‘लाव्हा’ उफाळून येतो व मणिपूर परत परत हिंसेच्या वणव्यात होरपळत राहते, असेही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’

परिस्थिती चिघळल्याने मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ‘आफस्पा’ कायदा लागू करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. सध्या ज्या जिरीबाम जिल्ह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे, तिथेही हा कायदा लागू करण्यात आला आहे. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला, असे मोठ्या तोंडाने सांगणाऱ्या केंद्र सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली? असा प्रश्नही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticized narendra modi over manipur violence spb