एकनाथ शिंदे तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लगली असून ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशील लढाई सुरु आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे सांगितले. तसेच मागील काही दिवसांत जे काही घडलं, ते जनतेला मान्य नाही; त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> “चमत्कार बाबा संजय राऊतांना राष्ट्रवादीत पाठवलं तरी नवाब सेनेवरील विघ्न टळेल”; ‘निष्ठा’ यात्रेवरून मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

“मला सर्वसामान्य जनतेला धन्यवाद द्यायचे आहेत. ज्यांची ओळख नाही असे अनेक लोक मसेज पाठवत आहेत. हळहळ व्यक्त करत आहेत. जे काही घडलं ते या लोकांना मान्य नाही. त्यामुळे हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “ते म्हणाले होते, माशाच्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत”, उद्धव ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण!

तसेच, “भारतीय पक्षाने जेव्हा घात केला, तेव्हाच आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे, ते जर अडीच वर्षांपूर्वी केलं असते; तर सगळं सन्मानाने झालं असतं. दोन हजार कोटी, तीन कोटी खर्चाचे आकडे येत आहेत. मात्र अडीच वर्षापूर्वी हे सन्मानाने झालं असतं. जे सन्मानाने झालं असतं ते घातपाताने का केलं? जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती, ती एवढा खर्च करुन का केली?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

हेही वाचा >>> शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह खरंच जाणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “कोणीही…”

“मला असं वाटतं, की विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. जर आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे. आम्ही घरी बसू. ते जर चुकले असतील, तर जनता त्यांच्याबद्दल जो निर्णय घेईल तोदेखील आम्हाला मान्य आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Story img Loader