शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहे. अगदी बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाईंचं शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे.

भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशाची घटना ताजी असताना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
Uddhav Thackeray vs Eknath Shinde over Shiv Sena chief Balasaheb Thackerays memorial
ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा लढाई! ठाकरेंना सूड उगवायचा आहे

हेही वाचा- “सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आशेचा किरण”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल!

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं मी मनापासून शिवसेनेत स्वागत करतो. दीपक सावंत यांनी मंत्री म्हणून काम केलंच आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी मंत्री नसतानाही अतिशय दुर्गम भागात काम केलं. त्याचा परिणाम देखील लोकांना पाहायला मिळाला. दुर्गम भागात चांगले उपचार मिळाले पाहिजेत, अशी संकल्पना त्यांनी मांडली. त्यांचा रुग्णालयांनादेखील फायदा झाला. शासकीय रुग्णालयात ज्या त्रुटी आहेत, त्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर उपाय करणे, याबाबतही त्यांनी मोठं काम केलं. आरोग्य मंत्री असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठी सेवा दिली.”

Story img Loader