ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ‘वज्रमूठ’ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्र सोडलं. सत्तेसाठी मी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो, तर तुम्ही आता मिंध्यांचे काय चाटत आहात? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना विचारला आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करतो? बरं ठीक आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही अधिक घट्ट आहोत.”

raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Image Of Rajeev Shukla
“काँग्रेस असो वा भाजपा, हा व्यक्ती…” कोल्ड प्लेच्या गायकाबरोबर राजीव शुक्लांचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

हेही वाचा- “पोलिसांना मस्ती आली असेल, तर…”; संभाजीनगरमधील सभेतून अंबादास दानवेंची थेट धमकी, नेमकं काय घडलं?

“मध्यंतरी अमित शाह पुण्यात येऊन गेले. त्यांनी माझ्यावर आरोप केले. मी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले, असं ते म्हणाले. मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही, असं नाहीये. पण मला आवरावं लागतं. काही शब्द, भाषा त्यांनाच (बाळासाहेब ठाकरे) शोभणारी आहे. मला ती भाषा शोभणारी नाही. पण मी त्यांना (अमित शाह) फक्त एवढंच म्हणालो की, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो. तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटत आहात?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा- “…तर आमदारकी कधी जाईल सांगता येत नाही”, संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंचं विधान

“बिहारमध्ये आधी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं. आता तेच सरकार पुन्हा स्थापन झालंय. चांगली चाललेली सरकारं फोडायची, हा किती भयानक प्रकार आहे. पण त्यावेळी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार पाडून तुम्ही नितीशकुमार यांचं काय चाटत होतात? हा माझा सवाल आहे. आता तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय चाटत आहात?” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Story img Loader