मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने अनेक ठिकाणी देव आणि धर्माचे मुद्दे मांडले होते. मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास सर्वांना रामलल्लाचे (राम मंदिर, अयोध्या) मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं होतं. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या या प्रचारावर आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई का करत नाही? असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. यावर निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगावरील त्यांची नाराजी व्यक्त केली.

दक्षिण मुंबईतील नरीमन पॉईंट येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयाचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. पक्षाच्या या राज्य जनसंपर्क कार्यालयाचं मंगळवारी (५ डिसेंबर) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pannuns Sikhs for Justice is dangerous to India
खलिस्तानी अतिरेकी पन्नूनची ‘सिख्स फॉर जस्टीस’ संघटना भारतासाठी धोकादायक का आहे?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Dr Mohan Bhagwat statement on religion
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”

उद्धव ठाकरे म्हणाले, मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मतं मागितली तर तो गुन्हा होतो का? कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीच्या नावाने मतं मागितली. तर मध्य प्रदेशात अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लांचं फुकट दर्शन घडवण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. परंतु, एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. ही कारवाई कमी होती की काय म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा मूलभूत अधिकारही काढून घेतला. यावेळी मी अमित शाह यांच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर दिलं नाही.

हे ही वाचा >> “भाजपाबरोबर जाण्याची पहिली भूमिका…”, अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, YB सेंटरचा उल्लेख करत म्हणाले…

ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, निवडणूक आयोगाने माझ्या पत्रास उत्तर दिलं नाही याचा अर्थ आम्ही काय मानायचा? होय! देवाच्या आणि धर्माच्या नावाने मतं मागायला तुमची काहीच हरकत नाही, असं आम्ही मानू का? उत्तर आलं नाही म्हणजे यावर तुमची काहीच हरकत नाही किंवा त्यास तुमची मान्यता आहे असं मानून आम्ही आगामी निवडणुकीत ‘जय भवानी… जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करून प्रचार करू. हिंदुत्वाचे प्रश्न उघडपणे मांडू, त्यावेळी तुम्ही आमच्यावर कारवाई करता कामा नये, तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही.

Story img Loader