मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने अनेक ठिकाणी देव आणि धर्माचे मुद्दे मांडले होते. मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास सर्वांना रामलल्लाचे (राम मंदिर, अयोध्या) मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं होतं. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या या प्रचारावर आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई का करत नाही? असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. यावर निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगावरील त्यांची नाराजी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा