काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही स्वार्थापोटी एक झाले आहेत अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली. शंभूराजे देसाई यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उदयनराजे भोसले बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना भाजपा महायुतीचीच सत्ता येणार असाही विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या भाषणात आजही अहंकार दिसतो. महापुरुषांचे विचारही काँग्रेस विसरली. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर यांना पडला एवढंच नाही तर महात्मा गांधी यांच्या विचारांचाही काँग्रेसला जपता आला नाही अशीही टीका उदयनराजे भोसले यांनी केली. आपल्या भाषणात त्यांनी श्रीनिवास पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला. श्रीनिवास पाटील म्हणतात तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मागणी करतात उमेदवारी मलाच हवी. त्यानंतर मी आरशात पाहणंच सोडून दिलं असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील यांची खिल्ली उडवली.

Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
Congress stays away from power can there be happiness in country
चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Mahayuti Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Dispute in Mahayuti: ‘चोराच्या उलट्या बोंबा’, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
Sharad Pawar
Sharad Pawar: ‘त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत’, राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांबाबत शरद पवारांचे सूचक विधान

आदित्य ठाकरे हे तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी त्यांचंही कौतुक केलं आहे. आम्ही विचारांनी एकत्र आलेली माणसं आहोत. त्यामुळे कायमस्वरुपी एकत्र राहू, आमच्या एकत्र येण्यामागे कोणताही स्वार्थ नाही असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. स्वार्थापोटी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळेच १५ वर्षात ते जनतेचं काहीही भलं करु शकलं नाही. त्यांचे विचारही वेगळे आहेत, ते स्वार्थापोटी एकत्र आल्याने त्यांची वाताहात झाली. हे दोन्ही पक्ष विचारांनी बांधलेले नाहीत.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा माझी अवस्था त्यांच्यासाठी पिंडीवरच्या विंचवासारखी होती. मला मारताही येत नव्हतं आणि हाकलताही येत नव्हतं. म्हणून मी राष्ट्रवादीतून बाहेर पडलो. जनतारुपी महादेव माझ्यासोबत आहे. मी कशालाही घाबरत नाही माझं तोंड कुणीही बंद करु शकत नाही असंही उदयनराजे यांनी भाषणात स्पष्ट केलं.