वर्धा : वर्धा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर रोठा या गावात गेल्या सात वर्षांपासून ‘उमेद’ हा प्रकल्प राबवला जात आहे. मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांचा सांभाळ करण्याचे व्रत याच गावचे रहिवासी असलेले मंगेशी मून यांनी हाती घेतले आहे. अजिबात शिक्षण वाट्याला न आलेल्या अनाथ मुलांसाठी आणि आईवडिलांनीच पोट भरण्यासाठी भिकेच्या मार्गाला लावलेल्या मुलांसाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. पारधी समाज समाजाच्या मूळ प्रवाहात येऊ इच्छित असला तरीही त्यांना समाजाकडूनच नाकारले जाते हे चित्र अजूनही ठळकपणे दिसून येते. आजही अशा वंचित समूहांचे, आदिवासींचे पाडे शहराच्या किंवा गावाच्या बाहेर लोकवस्तीपासून दूर कुठेतरी असतात. विशेषत: पारधी समाजासारख्या काही समुदायांवरील गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. अशा मुलांना शोधून त्यांच्या हातात पाटी-पेन्सिल देण्याचा ध्यास उमेदने घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा