भाजपा किंवा शिवसेना असेल इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते आहे त्यावर काहीही कारवाई होत नाही हे दुर्दैवी आहे असं माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. भाजपाच्याच कार्यकर्त्याला मारहाण होते आणि कारवाई होत नाही याला काय म्हणायचं? पोलिसांवर इतका दबाव कुणाचा आहे? ५५ लोकं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. आत्तापर्यंत असं वाटायचं की भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तर केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाडी वगैरे पडतील का? पण आता तर ही भीतीच राहिलेली नाही. गृहमंत्री स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना सांभाळू शकत नसतील, हल्ल्यांपासून वाचवू शकत नसतील तर नागरिकांनी करायचं काय? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. काही वेळातच ठाकरे कुटुंब ठाण्यात हल्ला झालेल्या रोशनी शिंदेंची भेट घेणार आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांनी आणखी काय म्हटलं आहे?

“ठाण्यात गद्दार लोकं राहतात. गणपतीच्या मिरवणुकीत बंदूक काढली गेली होती. अशा लोकांवर कारवाई का होत नाही? कोणीही येऊन बायकांना शिव्या देतात. सुषमाताईंना परवा ज्या शब्दांमध्ये गद्दार आमदार बोलले होते तसंच सुप्रियाताईंना एक गद्दार मंत्री बोलले. कुठेही कारवाई झाली नाही. कारवाई सोडा काही समजही दिली जात नाही. राज्यात नेमकं चाललंय काय आणि गृहखातं कुणाच्या दबावाखाली काम करतंय हा एक मोठा प्रश्नच आहे” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis on Meeting with MNS chief Raj
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Aditya Thackeray speaking about his criticism of the Adani Group's influence in Mumbai.
Aaditya Thackeray : “अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे”, आदित्य ठाकरेंचा घाणाघात

या लोकांना धास्ती आहे पण जेव्हा तुम्ही राज्यकर्त्यांच्या खुर्चीत बसता तेव्हा राज्यकर्ते म्हणून काम करणं अपेक्षित असतं. आत्ता राज्यात सगळा अंधाधुंद कारभार चालला आहे हेच दिसतं आहे. हे सगळं चाललेलं असताना पडद्याआड दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल तर मुंबई महापालिकेत अनेक भ्रष्टाचार समोर येत आहेत. अशा किती महापालिका असतील? निवडणुका न होऊ देणं, आता एक वर्ष होऊन गेलं तरीही निवडणुका घेतल्या गेलेल्या नाहीत. महापालिकेत मुंबईकरांचा पैसा कुठे जातो आहे?याचा विचार होण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही खरंतर शिवसेनेची संकल्पना होती. मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. उद्घाटन यांनी केली आणि फोटो स्वतःचे लावले. तरीही औषधांचा तुटवडा जाणवतोच आहे.उत्पादक आणि वितरकांच्या वादामुळे औषधं कमी पडत आहेत. कारभार करायचा कसा हे माहित नाही. तसंच कोस्टल रोडलाही विलंब लागतो आहे. अनेक कामांना विलंब लागतोय महाराष्ट्रात असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Story img Loader