भाजपा किंवा शिवसेना असेल इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते आहे त्यावर काहीही कारवाई होत नाही हे दुर्दैवी आहे असं माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. भाजपाच्याच कार्यकर्त्याला मारहाण होते आणि कारवाई होत नाही याला काय म्हणायचं? पोलिसांवर इतका दबाव कुणाचा आहे? ५५ लोकं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. आत्तापर्यंत असं वाटायचं की भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तर केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाडी वगैरे पडतील का? पण आता तर ही भीतीच राहिलेली नाही. गृहमंत्री स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना सांभाळू शकत नसतील, हल्ल्यांपासून वाचवू शकत नसतील तर नागरिकांनी करायचं काय? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. काही वेळातच ठाकरे कुटुंब ठाण्यात हल्ला झालेल्या रोशनी शिंदेंची भेट घेणार आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांनी आणखी काय म्हटलं आहे?

“ठाण्यात गद्दार लोकं राहतात. गणपतीच्या मिरवणुकीत बंदूक काढली गेली होती. अशा लोकांवर कारवाई का होत नाही? कोणीही येऊन बायकांना शिव्या देतात. सुषमाताईंना परवा ज्या शब्दांमध्ये गद्दार आमदार बोलले होते तसंच सुप्रियाताईंना एक गद्दार मंत्री बोलले. कुठेही कारवाई झाली नाही. कारवाई सोडा काही समजही दिली जात नाही. राज्यात नेमकं चाललंय काय आणि गृहखातं कुणाच्या दबावाखाली काम करतंय हा एक मोठा प्रश्नच आहे” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

gulabrao patil controversial statements marathi news
गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
Nagpur, Raj Thackeray, Ladki Bahin Yojana, raj thackeray on ladki bahin yojna, free money, employment, farmers' demands
राज ठाकरे म्हणतात “लाडकी बहीण योजना लवकरच बंद…”
Raj Thackeray, Raj Thackeray Wardha,
Raj Thackeray : “गत पाच वर्षांत या लोकांनी महाराष्ट्र नासवला,” राज ठाकरे असे का म्हणाले?

या लोकांना धास्ती आहे पण जेव्हा तुम्ही राज्यकर्त्यांच्या खुर्चीत बसता तेव्हा राज्यकर्ते म्हणून काम करणं अपेक्षित असतं. आत्ता राज्यात सगळा अंधाधुंद कारभार चालला आहे हेच दिसतं आहे. हे सगळं चाललेलं असताना पडद्याआड दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल तर मुंबई महापालिकेत अनेक भ्रष्टाचार समोर येत आहेत. अशा किती महापालिका असतील? निवडणुका न होऊ देणं, आता एक वर्ष होऊन गेलं तरीही निवडणुका घेतल्या गेलेल्या नाहीत. महापालिकेत मुंबईकरांचा पैसा कुठे जातो आहे?याचा विचार होण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही खरंतर शिवसेनेची संकल्पना होती. मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. उद्घाटन यांनी केली आणि फोटो स्वतःचे लावले. तरीही औषधांचा तुटवडा जाणवतोच आहे.उत्पादक आणि वितरकांच्या वादामुळे औषधं कमी पडत आहेत. कारभार करायचा कसा हे माहित नाही. तसंच कोस्टल रोडलाही विलंब लागतो आहे. अनेक कामांना विलंब लागतोय महाराष्ट्रात असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.