देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. येत्या १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग चालू झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांमधील कित्येक नेत्यांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये (एनडीएतील घटक पक्षांमध्ये) प्रवेश केला आहे. तर सत्ताधारी पक्षावर नाराज असलेल्या काही नेत्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्षांकडे वळवला आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी एनडीएतील पक्षांमध्ये प्रवेश केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने, अथवा तिकीट मिळावं या उद्देशाने एनडीएतील पक्षांमधील नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. अशातच भाजपाचा महाराष्ट्रातील एक मोठा नेता शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा