चंद्रपूर : मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २०० हेक्टरमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर तातडीने सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सर्वाधिक नुकसान राजुरा आणि पोंभुर्णा तालुक्यात झाले.

हेही वाचा >>> अकोला: महादेव-पार्वतींच्या लग्न सोहळ्याचा उत्साह; आदिवासी कोळी महादेव समाजाची शेकडो वर्षांची परंपरा

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Effects of climate change on agriculture Global warming Cyclone
शेतकऱ्याच्या अनुभवांचे बोल मोलाचे!
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
Cotton production, Cotton bales, textile industry,
कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी

मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तीन ते चारदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसाने खरीप हंगामावर पाणी फेरले गेले. त्यामुळे रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त होती. जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी यासह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. रब्बी हंगामात वातावरण चांगले असल्याने पीक उत्तम होते. अनेक भागांत पिके काढणी सुरू आहे. काही ठिकाणी पिके काढून ती शेतात ठेवण्यात आली आहे. यंदा पीक चांगले आल्याने शेतकरीही समाधानी होते. पीक काढणीनंतर हाती आलेल्या पैशातून कर्जाची परतफेड करू अशी आशा शेतकऱ्यांना होती.

हेही वाचा >>> वर्धा: देशातील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणतात, “सर्वांसाठी उच्च शिक्षणाची पूर्तता व्हावी”

भारतीय हवामान खात्याने १७, १८ मार्च रोजी ऑरेंज, तर १९ ते २१ मार्चदरम्यान येलो अलर्ट जारी केला. याच दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाला. राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यांत गारपीट झाली. रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा बसला. कापूस, तूर, हरभरा, गहू,ज्वारी पीक जागेवरच मातीमोल झाले. राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात बोराएवढ्या गारा पडल्या. त्यामुळे कापणी करून ठेवलेले पीक भुईसपाट झाले. पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवला. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू केले. राजुरा, पोंभुर्णा तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने जवळपास दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. अन्य तालुक्यांत नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Story img Loader