Weather Alert, Mumbai-Pune Unseasonal Rain : तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच काल रात्री पुणे, मुंबई राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, या गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! विमान उतरण्यापूर्वीच प्रवाशाकडून इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न; एअर होस्टेसवरही केला हल्ला

592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
26 highly dangerous buildings in Thane are occupied by residents municipality issued notices four months in advance
ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध

पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काल रात्री पुणे, मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळीदेखील कल्याण डोंबिवली, जळगाव, नाशिक तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक आणि जळगावमधील बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. नाशिकमध्ये द्राक्षांची झाडं कोसळली असून पिकांच मोठं नुकसान झालं आहे. येवल्यात काढणीस आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे. तर तीन एकर कांदादेखील भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

हेही वाचा – “…म्हणून आम्ही कुलूप तोडलं”, ठाण्यातील शिवसेना शाखेवर ताबा घेतल्यानंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया

जळगावमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊन झाल्याने केळी आणि गहू या पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय पालघरमध्येही गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंब्यासह इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागातही गारपीट झाल्याने कापसांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

Story img Loader