लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे असं मत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच १० जागांवर पोटनिवडणूक आहे, त्या ठिकाणीही जर असेच निकाल आले तरच मी म्हणेन की मतदार शिफ्ट झाला. मात्र तसं घडलं नाही तर ही तात्पुरती फेज आहे असं म्हणता येईल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच उद्धव ठाकरेंबाबत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आम्हाला फटका बसलेला नाही

महाविकास आघाडी बरोबर न गेल्याने आम्हाला फटका बसलेला नाही. याऊलट लोकांचा काही नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे. दलित आणि मुस्लिम उमेदवार जर मविआबरोबर गेला असेल तर जुलैमधल्या पोटनिवडणुकीत ते चित्र स्पष्ट होईल. ही फेज ता्त्पुरती आहे. विधानसभेत तर चित्र कळेलच. पण त्याआधी पोटनिवडणुका होणार आहेत त्यामध्येही समजेल असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत हे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Prakash Ambedkar On Thackeray Group
Prakash Ambedkar : ठाकरे गटाला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, “फक्त…”
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
assembly election 2024 Prakash Ambedkar announced he will fight independently along with OBC organizations
विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा! म्हणाले…
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : “अक्षय शिंदेला पोलीस कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते?”, प्रकाश आंबेडकरांचा सवाल
ajit pawar secular solapur speech
“भाजपसोबत सत्तेत असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्षच”, अजित पवार यांचा दावा

हे पण वाचा- विधानसभेसाठी ‘वंचित’ची स्वबळाची चाचपणी

पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप करुदेत हरकत नाही

पृथ्वीराज चव्हाण माझ्यावर आरोप करत असतील तर करुदेत. मात्र नागपूर आणि कोल्हापूरमध्ये आमचा पाठिंबा का घेतला? त्यांनी उत्तर द्यावं. आम्हाला कुठलाही डॅमेज वगैरे झालेला नाही. भाजपाचे नेते काय म्हणतात ते सोडा. पण एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी ही जी लढत झाली. त्यात एकनाथ शिंदेंनाही कमी मतं मिळाली नाहीत. एकनाथ शिंदेंच्या मतांमध्ये दलित, ख्रिश्चन, भटके, मुस्लीम यांची मतं नाहीत. ही जर तुलना पाहिली तर हिंदू मतांचं प्रमाण हे एकनाथ शिंदेंकडे जास्त आहे. मी भाजपाचं उदाहरण जाणीवपूर्वक देत नाही. पण त्यांचाही मतदार बोलका आहे असं मला वाटतं. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

उद्धव ठाकरे हे जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवली तर त्यांचा फायदा होईल. उद्धव ठाकरेंचा मतदार सध्या एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे. तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही जाऊ शकतो. पण उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडी बरोबरच राहिले तर त्यांचा फायदा होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत हे नाकारता येणार नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- बौद्ध, दलितांना शहाणे होण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

काँग्रेसच्या नेत्यांबाबत मी काहीही मत व्यक्त करत नाही. महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी महत्त्व देत नाही कारण तिथे हायकमांडची पद्धत आहे. हायकमांडकडून जे सांगितलं जातं तेच पुढे फॉलो होतं असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.