काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्याचंच चित्र आहे. मोदी आडनावाचे सगळे लोक चोर का असतात? हे वक्तव्य केल्यानंतर जो खटला त्यांच्याविरोधात दाखल झाला त्यामुळे त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालं. आता वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी कोर्टात राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसंच राहुल गांधींनी माझे आजोबा विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला आहे, त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

काय म्हटलं आहे सात्यकी सावरकर यांनी?

माझे आजोबा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे असं ट्वीट सात्यकी सावरकर यांनी केलं आहे.

maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
parli assembly constituency marathi news
धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘आघाडी’
anil bonde controversial remark on rahul gandhi
राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या
case register against MLA sanjay gaikwad
बुलढाणा : अखेर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल, काँग्रेस आक्रमक
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

आपल्या ट्वीटसोबत राहुल गांधीचा एक व्हिडीओही सात्यकी सावरकर यांनी जोडला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी म्हणताना दिसतात, “एक दिवस एका मुस्लीम माणसाला पाच लोकांनी मिळून मारहाण केली. त्यादिवशी वीर सावरकर यांना आनंद झाला. पाच लोक एका माणसाला मारहाण करत असतील आणि वीर सावरकरांना आनंद होतो असेल तर ती कायरता आहे. जर लढायचं असेल एकट्याने लढा. एका माणसाला पाच-सहा माणसांनी मारलं, सावरकर ही विचारधारा ठेवणारे होते” या आशयाचं एक वक्तव्य आहे. याच वक्तव्याचा संदर्भ देऊन सात्यकी सावरकर यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी माझं नाव राहुल गांधी आहे. माझं आडनाव सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान कराल तर याद राखा असा इशारा दिला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर टीका केली. तसंच राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि वीर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी वीर सावरकर गौरव यात्राही काढली होती. आता वीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या आहेत.