औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात तणाव निर्मण झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी अजूनही बंद पाळण्यात येतोय. यावरून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुस्लिम समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केल.

हसन मुश्रीफ म्हणाले, “गेला आठवडा झाला कोल्हापूरातील वातावरण बिघडलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिवशी मी निवदेन जाहीर केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच मनामध्ये आकस राहिलेला नाही. गोविंद पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकात लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर असो किंवा अन्य २२ वतनदार असो वा सैन्याचे प्रमुख असो या सर्व विश्वासूंशिवाय महाराज स्वराज्याची लढाई लढू शकले नसते. इतके सैन्य प्रमुख मुस्लिम असतील तर त्यामध्ये मावळे किती मुस्लिम असतील? या मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई केली. त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

loksatta Fact Check Dhanbad Lathicharge mahakumbh mela 2025 video
महाकुंभ मेळ्यात पोलिसांचे संतापजनक कृत्य! भाविकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण; पण VIRAL VIDEO मागचं नेमके सत्य काय? वाचा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…
Saif Ali Khan attack case Mental health Titwala suspect
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”

हेही वाचा >> Video : “वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग नेहमीच…” वारकरी लाठीमारप्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “संत परंपरेला संपवण्याचे…”

तसंच, “मुस्लिम धर्मीयांनी आपल्या अल्वयीन मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून हा इतिहास समजून सांगण्याची आवश्यकता आहे”, असंही ते म्हणाले. “फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतात राहिलो आणि भारताच्या मातीमध्ये आपली नाळ घट्ट झाली आहे. भारतीयांचा आणि भारतामध्ये राहणाऱ्या समाजाचा जी भक्ती असेल ती आपली भक्ती असली पाहिजे. त्यामुळे धर्म आपल्याआपल्या घरी करू, शांततेने करू, असं आवाहन मी केलं होतं”, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे

टिपू सुलतान याचे स्टेटस ठेवले म्हणून पुन्हा वातावरण बिघडले होते. त्या तरुणास अटक केली. अशा घडणाऱ्या घटनांसाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अशा घटनांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हिंदू-मुस्लिम समाजाने एकमेकांमध्ये सलोखा राहून शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

Story img Loader