भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यंदा विधानपरिषदेच्या जळगाव मतदारसंघाची निवडणूक रंगतदार झाली होती. भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही निवडणुकीच्या रिंगणात चंदू पटेल यांच्याविरोधात सात अपक्ष उमेदवार उभे होते. त्यामुळे ‘खडसे फॅक्टर’ चंदू पटेल यांना अपशकून करणार, का याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र, सरतेशेवटी चंदू पटेल यांनी ४२१ मते मिळवत विजय संपादन केला.

[jwplayer gzWvwV1h-1o30kmL6]

BMC budget 2025 news in marathi
पालिकेच्या अर्थसंकल्पाला मालमत्ता कराचा हात; १२५० कोटींनी उद्दिष्ट वाढले; ७५ टक्के मालमत्ता कर वसूल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
air pollution issue ignore in in delhi assembly elections
‘शुद्ध हवा’ नावडे दिल्लीकरांना…
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर
rahul gandhi mallikarjun kharge (1)
देणग्यांच्या बाबतीतही काँग्रेस पिछाडीवर; वर्षभरात जमा झाला १,१२९ कोटींचा निधी

या जागेसाठी खडसेंनी सुचविलेल्या विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांना उमेदवारी नाकारत महाजनसमर्थक चंदू पटेल यांना उमेदवारी दिली गेली. पक्षाचा क्रियाशील सदस्य नसलेल्या बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी देऊन भाजपने नवीन पायंडा पाडल्याची टीका खडसेंनी केली. त्यामुळे या निवडणुकीत चंदू पटेल यांना खडसे गटाकडून दगाफटका होऊ नये म्हणून गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचा गट सावध झाला होता. विरोधी पक्षातून प्रबळ उमेदवार समोर आल्यास त्यास नाराज गटाकडून रसद पुरविली जाण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचा उमेदवारच रिंगणात राहणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली होती. काँग्रेस, शिवसेना, खान्देश विकास आघाडीसह १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे रिंगणात भाजप विरोधात सात अपक्ष उमेदवार होते. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही अपक्षांचे ‘समाधान’ न झाल्यामुळे निवडणूक होत आहे. मागील निवडणूक खडसेंनी अविरोध घडवून आणली होती. सर्वाचे मतैक्य घडवत जगवानी विजयी झाले होते. महाजन यांचाही तोच प्रयत्न होता. परंतु, त्यात त्यांना यश मिळणार नाही अशी खेळी अपक्षांच्या मदतीने खेळली गेली. त्यामागे नाराज खडसे गट असल्याचे सांगितले जाते. यावेळी जिल्ह्य़ातील १३ नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांच्या खर्चाची बेगमी करण्याकडे रोख होता. आर्थिक दृष्टीने सक्षम उमेदवाराला रिंगणात उतरवत भाजपने कुठे कमी पडणार नाही याची दक्षता घेतली. उमेदवार निवड प्रक्रियेवर खडसेंनी बोट ठेवल्याने ही निवडणूक गांभीर्याने घेऊन महाजन गटाने सर्व आघाडय़ांवर व्यूहरचना करण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

[jwplayer WH6ZUMPe-1o30kmL6]

Story img Loader