विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.

भाजपा उमेदवारांचा मतांचा कोटा पूर्ण

आतापर्यंत हाती आलेलेल्या निकालानुसार, पंकजा मुंडे यांना २६ मते, योगेश टीळेकर यांना २६ मते, परिणय फुके यांना २६ मते, तर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी २६ मते मिळाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी केवळ २३ मतांची आवश्यकता होती. या २३ मतांचा कोटा भाजपाच्या पाचही उमेदवारांनी पूर्ण केला आहे.

Narela Assembly Election Result 2025
Private: Narela Vidhan Sabha Election Result 2025 Live: नरेला विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi Exit Poll
दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल
Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
Budget 2025 Bihar National Institute of Food Technology
निवडणूक वर्षात बिहारवर पुन्हा खैरात

हेही वाचा – Breaking : विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी!

निकालानंतर गिरीश महाजन म्हणाले…

दरम्यान, या निकालानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे जेवढी मतं आहेत, ती मते आम्हाला मिळाली आहे. कोणाकडे किती मते कमी आहे आणि कुणाचे आमदार फुटली, हे थोड्याच वेळात कळेल, या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. पण केवळ ११ उमेदवार निवडून येणार होते. त्यापैकी महायुतीचे संपूर्ण ९ उमेदवार विजयी झाले, असे ते म्हणाले.

विजयानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया…

या निवडणुकीतील विजयानंतर पंकजा मुंडे यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. या विजयानंतर मला आनंद झाला आहे. यापूर्वी देशपातळीवर काम केलं आहे. आता राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे, या निवडणुकीत ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Story img Loader