रामगिरी महाराज यांच्या समर्थानार्थ अहमदनगर येथे काढलेल्या मोर्चात बोलताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांना वादग्रस्त विधान केलं होतं. रामगिरी महाराजांविरोधात कुणी बोललं, तर मशिदीत घुसून मारू, असं ते म्हणाले होते. या विधानानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं असून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंच्या या विधानावरून सत्ताधाऱ्यावर टीकास्र सोडलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्स या समाज माध्यमावर नितेश राणे यांचा व्हिडीओ पोस्ट करत सत्ताधाऱ्यावर टीका केली आहे. हे दंगलखोर कोण आहे? सरकारने यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Former Khanpur legislator Kunwar Pranav Singh Champion.
भाजपाच्या माजी आमदाराला अटक, अपक्ष आमदाराला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Anjali Damania Demand
Anjali Damania : व्हायरल फुटेजनंतर अंजली दमानियांची मागणी, “राजेश पाटील यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि…”
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”
Uddhav thackeray amit shah saif ali khan attacker
“ही देशाच्या गृहमंत्र्यांसाठी शरमेची बाब”, सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर असल्याचं समजताच ठाकरे गटाचा हल्लाबोल
Anand Dave on Saif Ali khan
“तैमुर नावामुळे सैफवर हल्ला झाला असता तर आम्हाला…”, जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना आनंद दवे यांचं विधान
Sharad Pawar Saif Ali Khan
“सैफच्या मुलाचाच बळी जाणार होता, पण…”, शरद पवार गटातील आमदाराचा मोठा दावा; म्हणाले, “सत्य सांगायला…”

हेही वाचा – एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, मग हे आमदार कोण आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाला घुसून मारण्याची भाषा करत आहेत? राज्याचे गृहविभाग कुठं आहे? गृहमंत्री गप्प का? अद्याप कोणती कारवाई का नाही नाही?”, असे प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.

पुढे बोलताना, “सरकार नितेश राणे यांच्यावर कारवाई करणार नाही आणि करूही शकत नाही. कारण सत्ताधाऱ्यांना अशा दंगलखोरांना तसेच गुंडांनाबरोबर घेऊन दंगल घडवायची आहे. हे लोक सत्तेसाठी महाराष्ट्र जाळायला निघाले आहेत”, असा आरोपही त्यांनी केला. “तुम्हाला महाराष्ट्राचे भल व्हावं, असे वाटत असेल तर या चिथावणीखोर आमदारावर कारवाई करा”, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा – Eknath Khadse : “…अन्यथा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार”, एकनाथ खडसेंचं मोठं विधान

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या सभेला संबोधित करताना भाजपाचे आमदार नितीश राणे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. “आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू”, असा थेट इशारा त्यांनी दिला होता. तसेच “रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे”, असेही ते म्हणाले होते.

Story img Loader