Vijay Wadettiwar : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघाताने पडला, असं विधान आज मंत्री दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरून दीपक केसरकर यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमंक काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे. महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले, हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy
Atishi : अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट, मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप; म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, कारण…”
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
bombay HC slaps Rs 1 lakh cost on ED for case on realtor
विकासकावर खोटा खटला; पुराव्यंशिवाय कारवाई, न्यायालयाचे ताशेरे
security forces killed 14 naxalites
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर चकमकीत १४ नक्षलवादी ठार
Orders for action against Bangladeshi infiltrators in Pune
पुण्यात बांगलादेशींवर घुसखोरांवर कारवाईचे आदेश

हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Statue: “आता सिंधुदुर्गात १०० फुटांचा पुतळा…”, २८ फुटांचा पुतळा कोसळल्यानंतर दीपक केसरकर यांचे विधान

पुढे बोलताना, “बदलापूर प्रकरण अपघात होता, समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले तो अपघात होता, नांदेडमधील शासकीय रुग्णालयात लोकं मेली तो अपघात होता, ठाणे शासकीय रुग्णालयात लहान बालके मेली तो अपघात होता, महाराष्ट्रभर ड्रग्सचा सुळसुळाट सुरू आहे, तो एक अपघात आहे. ललित पाटील पळाला तो अपघात होता, रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत, ते सुद्धा अपघाताने सुरू आहे. असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहेत”, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.

“तीन ड्रायव्हर आणि एक स्टिअरिंग असल्यावर स्टिअरिंग हातात घेण्यासाठी मीच किती मोठा जनतेचा रखवाला आहे, हे दाखवण्यासाठी जी धडपड तिघांची सुरू आहे, त्यामुळेच हे सगळे अपघात घडत आहेत”, असा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला.

हेही वाचा – Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या शाळेतील CCTV फूटेज गायब! चौकशी समितीचा अहवाल समोर, शिक्षणमंत्री म्हणाले, “वर्गशिक्षिकेला…”

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले होते?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे. त्यामुळे नागरिकांनी या पद्धतीने याकडे बघावं, कदाचिक वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्यामुळे हा अपघात घडला असेल. हा अपघात नेमका कसा घडला. याचा तपास सुरू आहे. यात जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई सुद्धा होईल. पण कारवाई केल्याने जखमी भरून येत नाही. जखमा भरून यायच्या असतील, तर अतिशय भव्य पुतळा याठिकाणी उभा करावा लागेल. महाराजांसाठी तीच खरी आदरांजली ठरेल”, असं दीपक केसरकर म्हणाले होते.

Story img Loader