प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे सध्या भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आहेत. महायुतीच्या या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला आहे. परंतु, त्यांनी आपल्याच सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. बच्चू कडू यांनी आज (९ ऑगस्ट) अमरावतीत जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या १० प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या मोर्चाद्वारे बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेने एकनाथ शिंदे सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, बच्चू कडू यांना कोण ऐकतं? त्यांना कळून चुकलंय… पुढच्या काही दिवसात बच्चू कडूंना कळेल की त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे ते लवकरच योग्य निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

हे ही वाचा >> महात्मा फुले-सावित्रीबाईंचा विचार सांगणारे हरी नरके काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन

यावेळी विजय वडेट्टीवार हे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवरही बोलले. वडेट्टीवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराची केवळ चर्चा सुरू आहे. ही चर्चा अशीच सुरू राहील. पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही चर्चा सुरू ठेवली जाईल. किमान पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी असंच चित्र कायम राहील. कारण सध्या शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक जण नाराज आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांमध्येही नाराजी आहे. या नाराजी नाट्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

Story img Loader