राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी रविवारी (१० सप्टेंबर) कोल्हापूर येथे आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली. यावेळी अजित पवार म्हणाले, मी आज महाराष्ट्राला एक गोष्ट सांगतो. उद्धव ठाकरे यांचं सरकार (महाविकास आघाडी) ज्या दिवशी पडत होतं, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केलं आणि ते पत्र नेत्यांना दिलं. या पत्रात म्हटलं होतं की महायुतीत सामील व्हा. हे खोटं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. कुणाची तयारी आहे का? आणि हे खरे असेल तर मग जे लोक खोटं बोलत आहेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे. आहे का त्यांची तयारी? आम्ही केवळ जनतेच्या कामांच्या दबावापोटी सत्तेत सहभागी झालो आहोत.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, कोणी काहीही म्हणू देत, कितीही इमानदारीची भाषा करू देत. आमच्याकडेही पुरावे आहेत. कोण कशासाठी गेलाय? कोण सत्तेसाठी गेलाय? कोण सेवेसाठी गेलाय? कोण विकासासाठी गेलाय आणि कोण संस्थांच्या (ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स) दबावात गेलाय? आमच्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. योग्य वेळी, आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या गोष्टी, कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघड करू. त्यामुळे विरोधकांना तुम्ही जी धमकी देताय, इशारे देताय, ते सहन करण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आम्ही नाही.

construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
Plenty of funds for Katraj-Kondhwa road widening but land acquisition is pending
शहरबात : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी निधी भरपूर, भूसंपादन कधी?
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….
hunger strike for Vidarbha, politics Vidarbha,
नेते राजकारणात व्यग्र, विदर्भ राज्यासाठी उपोषणकर्ती रुग्णालयात
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : न्यायदानातील विलंबही कारणीभूत

विजय वडेट्टीवार अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सोडून तिकडे गेलात, ते कशासाठी गेलात हे जनतेला माहिती आहे. तुम्ही किती पापं लपवली तरी कशामुळे गेलात हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले, अनेक जण आमची बदनामी करतात. आम्ही महायुतीत सामील झालो म्हणून टीका करतात. आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सामील झालो असा दावा करतात. आमच्यावर लोकांची कामं करण्याचा दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. संधी मिळाल्यावर लोकांची कामं केली पाहिजेत.