दिगंबर शिंदे

सांगली : सहा विधानसभा मतदारसंघ, आठ तालुके आणि सुमारे दोन हजार मतदान केंद्रे आहेत. मग या मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर तरी तुमच्या पक्षाकडे कार्यकर्ते आहेत का, असा प्रश्न भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना विचारला. पाठिंब्यासाठी आलेल्या राऊत यांना विचारलेल्या सवालाची ही चर्चा आज दिवसभर जिल्ह्यात रंगलेली होती.

Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Sanjay Raut on Chandrakant Patil Statment
Sanjay Raut : शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चांवर संजय राऊतांची रोखठोक भूमिका, चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
question arises if the second term of election wasted former corporators and aspirants
दुसरी टर्मही वाया जाणार ? निवडणुकांवरची सुनावणी लांबल्याने अनेकांच्या पोटात गोळा
shivsena leader sanjay raut
पदाधिकारी म्हणतात आपण स्वबळावर लढलं पाहिजे – संजय राऊत
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा मिळविण्यासाठी खा. राऊत यांनी जगताप यांची जतमध्ये भेट घेतली. भाजपबद्दल आणि भाजप उमेदवाराबाबत नाराजी असल्याने शिवसेनेचे पाटील यांना पाठिंबा द्यावा, अशी आग्रही मागणी खा. राऊत यांनी केली. यावेळी जगताप यांनी सांगितले, की तुमच्या पक्षाची या जिल्ह्यात ताकद नाही. ज्या पक्षाची ताकद आहे, त्याला उमेदवारी मिळणे गरजेचे असताना शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे.  प्रचार करणे तर दूर पण मतदारसंघातील या दोन हजार मतदान केंद्रांवर, बूथवर पक्षाचे काम करण्यासाठी देखील कार्यकर्ते उपलब्ध नाहीत. मग एवढय़ा मोठय़ा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराचे भवितव्य काय असणार? काँग्रेसचे विशाल पाटील उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून त्यांचा काय निर्णय होतो यावर पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र अशा पद्धतीने तिरंगी लढत झाल्यामुळे भाजपचा फायदा नक्कीच होणार असल्याची खंत जगताप यांनी व्यक्त केली.

Story img Loader