Vinayak Raut : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदान याठिकाणी पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही? हा सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी लवकरच स्पष्ट करेन असं सांगितलं आहे. तर ठाकरे सेनेच्या नेत्याने एकनाथ शिंदेंची गरज संपली आहे असा टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची संमती मागितली. राज्यपाल महोदयांनी संमती दिली. ५ डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे. मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून शिफारस केली होती. आज मी शिवसेनेचं समर्थन असलेलं पत्र राज्यपालांना दिलं आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांनी जो निर्णय घेतला त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीला आजवरच्या इतिहासात कधीही इतकं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. मी आजारी होतो तरीही अनेक बातम्या चालवण्यात आल्या. पण खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होतील की नाही हे स्पष्ट व्हायचं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Ajit Pawar On Raigad DPDC Meeting
Ajit Pawar : महायुतीत धुसफूस? ‘डीपीडीसी’च्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर; अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही आमदारांना…”
eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

काय म्हणाले विनायक राऊत?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला शपथ घेत आहेत. २३ तारखेला मतमोजणी झाली त्यानंतर १० ते १२ दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतो आहे. खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एवढं प्रचंड बहुमत मिळूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठरला नव्हता. सुमारे १३ दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही यामागचं कारण काय? हे भाजपा आणि गद्दार गटाने स्पष्ट करणं गरजेचं आहे. दोन दिवसांपासून लाडक्या बहिणींची वाताहत लावण्याचं काम सुरु झालं आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हाल सहन करतो आहे. या प्रश्नांच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष आहे असं विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Eknath Shinde on CM: मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले विनायक राऊत?

“एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही. गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा असं सांगायची ताकद भाजपाने ठेवली आहे. ५ डिसेंबरला जो शपथविधी होतो आहे त्यासंबंधीच्या निर्णयात एकनाथ शिंदे सहभागी नाहीत. तसंच त्यांच्या विचारांना कुठलीही किंमत देण्यात आलेली नाही. तु्म्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर अजित पवार आहेत बरोबर. अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच काढली आहे. ” असंही विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे

एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपाने शिंदेंच्या माध्यमातून केली आहे. तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्राची फसवणूक जशा प्रकारे करण्यात आली आहे ती पुरे झाली. आता महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा किंवा ते सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार ते सांगा असंही विनायक राऊत म्हणाले. वारेमाप पैशांचा वापर निवडणुकीत केला गेला. तसंच ईव्हीएमचा घोटाळा १०० टक्के झाला आहे. हा मेरिटवर मिळालेला विजय नाही असंही राऊत ( Vinayak Raut ) म्हणाले.

Story img Loader