काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम भाजपाच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा होती. याबाबत अनेक ठिकाणी वृत्तही प्रसारित झाले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता स्वतः विश्वजीत कदम यांनीच या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मला भाजपाच्या पक्षप्रवेशाची ऑफर आहे आणि मी भाजपात जाणार या चुकीच्या बातम्या आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका,” असं मत विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलं. ते सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते.

विश्वजीत कदम म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. माझ्यावर इतका फोकस का आहे मला कळत नाही. माझ्यावर काही लोकांचं अतिप्रेम असू शकेल. म्हणून माझ्यावर फोकस आला असेल. मला एवढंच सांगायचं आहे की, मी कुठल्याही वेगळ्या भूमिकेत, विचारात नाही. पंतगराव कदम आणि मोहन कदम यांच्या आदर्श विचारांचा वारसा माझ्याकडे आहे.”

Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Delhi Election Result 2025
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’च्या नेत्यानेच केजरीवालांना दिला सल्ला; म्हणाले, “काँग्रेसबरोबर…”
US will take over Gaza Strip,
गाझा पट्टी ताब्यात घेऊ!ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा; अमेरिकेच्या मित्रांकडूनही विरोध
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती

पाहा व्हिडीओ –

“चुकीच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नका. या फक्त अफवा आहेत, एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो,” असंही विश्वजीत कदम यांनी नमूद केलं.

हेही वाचा : काँग्रेस नेते विश्वजीत कदमांच्या निकटवर्तीच्या घरी सीबीआयचा छापा, राजकीय वर्तुळात खळबळ

महाविकासआघाडी सरकारवर बोलताना ते म्हणाले, “गेल्या महिन्यात अपघात घडला आणि आमचं सरकार गेलं. परंतु मला खात्री आणि विश्वास आहे की, येणाऱ्या काळात पुन्हा आमचं सरकार येईल आणि शेतकरी, ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू.”

Story img Loader