पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढाई प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. प्रचारादरम्यान कीर्तन, लग्नसराई अशा विविध कार्यक्रमांत एकमेकांसमोर आलेल्या आढळराव आणि कोल्हे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, यंदा शिरूरमध्ये केवळ ५४.१६ टक्केच मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ५.३० टक्के मतदान कमी झाले आहे. हा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> मतांच्या ध्रुवीकरणावर निकाल अवलंबून

Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

मतदारसंघातील बलाबल यांचा विचार केल्यास चार विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, तर एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि एक आमदार भाजपचा आहे. त्यामुळे वरकरणी आढळरावांचे पारडे जड वाटत असले, तरी कोल्हे यांनी समाजमाध्यमातून आणि थेट अजित पवार यांनाच अंगावर घेत प्रचारात मुसंडी मारली होती. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. राज्याचे सहकार मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घरातच पाय घसरून पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. परिणामी, ते प्रचारापासून दूर राहिले. त्याचा फटका आढळराव यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हे यांच्यावर टोकाची टीका केल्याने त्यांना सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हे यांनी पाच वर्षे मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नसल्याची टीका त्यांच्यावर झाली. तसेच अभिनेता म्हणून पाच वर्षे ‘ब्रेक’ घेणार असल्याची त्यांची भूमिका प्रचारात त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, मतदानाच्या टक्केवारीत हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ सर्वात तळाशी दिसत असले, तरी प्रत्यक्ष मतदान हडपसरमध्ये सर्वाधिक दोन लाख ७७ हजार ६४५ आणि भोसरीत दोन लाख ७२ हजार ५३९ इतके झाले आहे. त्यामुळे हे दोन मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत.

Story img Loader