लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटामुळे महायुतीला फटका बसला असल्याचं आरएसएसच्या मुखपत्रातील लेखात म्हटलं होतं. तेव्हापासून अजित पवारांना टार्गेट केलं जातंय, अशी चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार वेगळा निर्णय घेतात की महायुतीतूनच लढतात हा प्रश्नचिन्ह अधोरेखित झाला आहे. यावर, आज चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रातील पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी काल (मंगळवारी) दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवारांबाबत काय चर्चा झाली का? अजित पवार गट आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार की महायुतीतून असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महायुतीत सर्वांनाच एकत्र काम करायचं आहे. महायुती पुढे नेण्याकरता काम करायचं आहे.” असं बोलून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या भूमिकेबाबत स्पष्ट वक्तव्य करणं टाळलं आहे.

Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
atishi takes charge as delhi cm with empty chair
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार; कारण सांगत म्हणाल्या…
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
dcm ajit dada pawar appeal women voters to elect mahayuti in assembly elections to continue ladki bahin yojana
बुलढाणा : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, ‘लाडकी बहीण कायम ठेवायची असेल तर युतीला निवडून द्या’
shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’

हेही वाचा >> दिल्लीतल्या बैठकीत निर्णय, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!

अजित पवारांना टार्गेट केलं जातंय, असं म्हटलं जातंय. त्यामुळे अजित पवारांना टार्गेट केलं गेलं तर विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार केला जाईल असाही इशारा देण्यात आलाय. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आमच्याकडून तरी झालेला नाही.

छगन भुजबळ नाराज?

छगन भुजबळांच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांची नाराज का आहे? त्यांची भूमिका काय हे समजल्याशिवाय मी माझं मत व्यकत करू शकत नाही.

फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी

फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी अशी विनंती केली आहे. त्यांनी ती विनंती मान्य केली आहे असं आम्ही समजतो. केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो. महायुती सरकार लोकांच्यासाठी काम करेल, यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणे आवश्यक आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजपात अद्याप पक्षप्रवेश झालेला नाही. त्यामुळे भाजपात आल्यावर त्यांना कोणती संधी दिली जाणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बावनकुळे म्हणाले, “एकनाथ खडसे अद्याप भाजपात आलेले नाहीत. ते भाजपात येतील तेव्हा पाहू. आमचे प्रभारी अश्विनी वैष्णव याबाबत निर्णय घेतील.”

नाना पटोलेंनी इंग्रजांचा काळ आणला

“नाना पटोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले आहे. शेतकऱ्यांकडून पाय धुवायला लावत आहेत. या महाराष्ट्रात अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे”, अशीही टीका बावनकुळेंनी केली.