पक्षी नसेल तर उद्याचे जीवन जगता येणार नाही. पक्ष्यांचे रक्षण करून निसर्ग व शेतीला फायदा करून देतानाच पर्यटनालाही फायदा होईल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. नेरुरपार येथील वसुंधरा येथील सेव नेचर, सेव बर्ड या उपक्रमाप्रसंगी रेल्वेमंत्री प्रभू बोलत होते. या वेळी माजी आमदार राजन तेली, वाइल्ड कोकण अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपवनसंरक्षक रमेशकुमार, लुपीनचे योगेश प्रभू, सी. बी. नाईक, अमेय सुरेश प्रभू, उमा सुरेश प्रभू आदी उपस्थित होते. लुपीन फाऊंडेशन व वाइल्ड कोकणच्या विद्यमाने जिल्ह्य़ातील पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच पक्ष्यांसाठी पाणी व दाणे योजनेचा शुभारंभ करण्यात आल्यावर रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. निसर्गाची विविधता पाहतानाच पक्षी, वनौषधीचे संरक्षण व संवर्धन व्हायला हवे. निसर्गाचा कोप किती भयंकर असतो हे जगात घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच निसर्गाचे रक्षण महत्त्वाचे आहे, असे रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा