बारसूतल्या लोकांवर अत्याचार केला जातो आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उद्धव ठाकरे पोहचत आहेत. आंदोलकांचं म्हणणं उद्धव ठाकरे समजून घेणार आहेत. त्यानंतर ते महाडला सभेसाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही बारसूच्या कष्टकऱ्यांसोबत आहोत, भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ठाकरे कुटुंब आणि कोकण याचं एक नातं आहे

शिवसेना, ठाकरे कुटुंब आणि कोकण असं एक नातं आहे. शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही. शिवसेना तिथले शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत आहेत. जे भांडवलदारांचे दलाल आहेत त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची चिंता आहे. परप्रांतियांच्या माध्यमातून या दलालांनी गुंतवणूक केली आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अख्खी शिवसेना तिकडे जागेवर आहे का येऊ देणार नाही? पोकळ धमक्या देणं बंद करा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
sanjay raut
Sanjay Raut : “ही मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची अवलाद, अशा लोकांना तर…”; दीपक केसरकरांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊत आक्रमक!
Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: या कारवाईने ओरखडाही येणार नाही

आम्ही आंदोलकांसोबत, कष्टकऱ्यांसोबत

या देशात, राज्यात लोकशाही आहे. आंदोलक कुणाच्या जमिनी हिसकावून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. ते आपली जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आपली जमीन वाचवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. जमीन त्या आंदोलकांची आई आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.रोजगाराचं आमीष दाखवलं जातं आहे ते तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं जातं आहे. आम्ही जमिनींचं रक्षण करणाऱ्यांच्या सोबत आहोत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांचा राजीनामा मागे घेण्यावरही प्रतिक्रिया

जे काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या बाबतीत घडलं त्याला शक्ती प्रदर्शन म्हणणं हे मला उचित वाटत नाही. शरद पवार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. हा पक्ष शरद पवारांच्या नावाने ओळखला जातो. आम्ही जसं बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. तसे फार मोठे नेते शरद पवार आहेत. शरद पवारांनी बहुदा एक भावनिक निर्णय घेतला आहे. त्यांनी लोकांच्या आग्रहासाठी तो निर्णय मागे घेतला असेल तर आम्हाला आनंद आहे. पुढच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी मैदानात असणं आवश्यक आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.