महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून प्रत्येक ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप करण्यात आली नाही. तसेच विविध जिल्ह्यात पालकमंत्रीही नेमण्यात आले नाहीत. यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, खातेवाटप नेमका कधी होणार? याबाबत निश्चित कालावधी सांगितला नाही. पण पालकमंत्री नेमण्याबाबत त्यांनी संकेत दिले आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी पालकमंत्र्यांची घोषणा केली जाईल, अशी माहिती सामंतांनी दिली आहे. ते रत्नागिरीच्या पत्रकारांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत होते.

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या 'कारभारा'वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या ‘कारभारा’वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय?

हेही वाचा- मोठी बातमी! ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

खरं तर, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पण ठाकरे गटाकडून विविध प्रकारच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर ४० दिवसांनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र, अद्याप खातेवाटप करण्यात आलं नाही.

Story img Loader